दोन्ही निकाल माझ्या बाजूनेच, देश कायद्यानेच चालतो : नारायण राणेnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnभा.ज.पा.च्या जन आशीर्वाद यात्रेदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आक्षेपार्ह विधान केलं होतं.nत्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यानंतर २४ ऑगस्टला त्यांना अटक करण्यात आली होती.n२४ ऑगस्टला तारखेला उशिरा रात्री त्यांना जामीन मंजूर करण्यात आला.nत्यानंतर राज्याचं राजकारणात जोरदार पडसाद उमटू लागले आहेत.nशिवसेना भा.ज.पा.मध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत.nदरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत उत्तरं दिली.n२७ ऑगस्टपासून जन आशीर्वाद यात्रेला पुन्हा सुरुवात होईल असं त्यांनी यावेळी सांगितलं.nनारायण राणे यांना १७ सप्टेंबरपर्यंत दिलासा मिळाला आहे.nपुढील सुनावणीपर्यंत कोणतीही कारवाई करणार नाही अशी ग्वाही सरकारने मे.मुंबई उच्च न्यायालयात दिली आहे.n“दोन्ही निकाल माझ्या बाजून लागले आहेत.nदेशात अजूनही कायद्याचं राज्य आहे हे दिसून येतं.nकाही जण माझ्या मैत्रीचा आणि चांगुलपणाचा फायदा उचलतात हेही माझ्या लक्षात आलं आहे.nजन आशीर्वाद यात्रा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली काम जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आहे.nगेल्या सात वर्षात त्यांनी केलेली काम तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम सुरु आहे.nदुसरं देशाच्या केंद्रीय मंत्रिमंडळात मला कॅबिनेट मंत्रिपद दिलं.nतेव्हा पंतप्रधान मोदी यांनी सर्व मंत्र्यांना सांगितलं की,nतुम्ही तुमच्या राज्यात जा आणि जनतेचा आशीर्वाद घ्या.nतुमच्या कामकाजाला सुरुवात करा.n१९ ऑगस्टपासून मी माझ्या जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली.nआता दोन दिवस विश्रांती घेत परवापासून सिंधुदुर्गातून यात्रेला सुरुवात होईल.nत्यामध्ये व्यत्यय पडणार नाही.”,nअसं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सांगितलं.