करोनाच्या औषधासाठी काढलेल्या टेंडरमध्ये भ्रष्टाचार,nनारायण राणेंचा गंभीर आरोप……nnमहाराष्ट्राचं शोषण करणारं हे सरकार असून करोनाच्या औषधासाठी काढलेल्या टेंडरमध्येही या सरकारनं भ्रष्टाचार केला असल्याचा गंभीर आरोप नारायण राणे यांनी केला आहे.nआपण लवकरच या सरकारचा भ्रष्टाचार उघड करणार असल्याचंही त्यांनी सांगितलंं आहे.nझालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे.nसध्याचं सरकार हे महाराष्ट्राचं शोषण करणारं सरकार असून त्यांच्या सगळ्या खात्यांमधला भ्रष्टाचार आपण पुराव्यानिशी उघड कऱणार असल्याचा खुलासाही नारायण राणे यांनी केला आहे.nत्याचबरोबर उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाच्या लायकीचे नाहीत असं सांगत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर घणाघाती प्रहार केला आहे.nसंजय राऊत, महाविकास आघाडी यांच्या कारभारावर त्यांनी कडक भाषेत ताशेरे ओढले आहेत.nया सरकारने करोनाच्या औषधांसाठी काढलेल्या टेंडरमध्येही भ्रष्टाचार केला आहे.nn⭕लसींचं टेंडर का रद्द केलं?nnराऊतांनी उत्तर द्यावं,nअसंही ते यावेळी म्हणाले.nसंजय राऊत प्रत्येक वेळी केंद्रावर, मोदींवर बोट ठेवतात, मग सरकारनं सरळ केंद्रातच विलीन व्हावं असंही ते म्हणाले.nराज्यातल्या करोना परिस्थितीबद्दल ते म्हणतात, करोना संपवणं याच्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे.nउलट करोना या सत्ताधाऱ्यांना लाभदायक आहे.nत्यांना यानिमित्ताने पैसे खायला मिळाले.nत्याचबरोबर सरकारनं लोकांना वाचवण्यासाठी आत्तापर्यंत काहीही केलं नाहीnना लसी आहेत,nना व्हेंटिलेटर्स आहेत.nकाहीच नाही,nअशा शब्दात त्यांनी सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत.nजनाची नाही तर मनाचीही नसलेलं हे सरकार असून ते मुख्यमंत्री पदाच्या लायकीचंच नसल्याची कठोर टीकाही त्यांनी केली आहे.