मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन :nऔरंगाबादमध्ये संतपीठ स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा!nn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnमराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत.nयावेळी मुख्यमंत्यांनी पुष्पचक्र अर्पण करून मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुतात्म्यांना अभिवादन केलं.nयावेळी बोलताना मराठवाड्यात संतपीठ स्थापन करण्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली.nगेल्या अनेक दिवसांपासून हे संतपीठ व्हावं अशी चर्चा होती.nडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मार्गदर्शनाने हे संतपीठ सुरू केलं जाणार असून लवकरात लवकर ते मोठं विद्यापीठ व्हावं,nअशी अपेक्षा देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.nया संतपीठामध्ये महाराष्ट्राच्या संतपरंपरेतील संतांची शिकवण दिली जाईल,nअसं देखील मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.n“मराठवाडा ही संतांची भूमी आहे.nमराठवाड्याचं वेगळेपण काय आहे.nत्यासाठी संतपीठ हे काही वर्षांपासून चर्चेत होतं.nते संतपीठ आपण स्थापन करत आहोत.nत्या संतपीठात आपल्या संतांची शिकवणूक दिली जाईल.nn*संतांची शिकवण म्हणजे काय?*nnआम्ही कुणावर अन्याय-अत्याचार करत नाही.nपण जर कुणी अत्याचार केला,nतर त्याचा प्रतिकार कसा करायचा,nही आम्हाला संतांची शिकवण आहे.nम्हणून एक संतपीठ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मार्गदर्शनाने आपण इथे सुरू करत आहोत.nहे आज संतपीठ होतंय,nते विद्यापीठ झालं पाहिजे.nजगभरातले अभ्यासक इथे अभ्यास करण्यासाठी यायला पाहिजेत”,nअसं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.n१५० निजामकालीन शाळांचा पुनर्विकास करणार “निजामशाहीच्या काही खुणा आहेत.nनिजामशाहीच्या काळातल्या शाळा आता पडायला आलेल्या आहेत.nही काही वैभवशाली परंपरा नाही.