भाटघर येथील वीजनिर्मिती बंद!
धरणातील पाणी पातळी घटल्याने निर्णय.
सचिन तरंगे ( शिव-कल्याण न्यूज नेटवर्क )
भाटघर धरणात सद्या 6.4 टीमसी
इतकाच पाणी साठा शिल्लक आहे,त्यामुळे या परिसरातील नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याकरिता या धरणातील जलविद्युत वीज प्रकल्प बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
भाटघर च्या जलविद्युत वीज निर्मिती प्रकल्प केंद्रात साधारणतः चोवीस तासांत 16 मेगावॉट वीजनिर्मिती होते.
भाटघर धरण 100 टक्के पूर्ण छमतेने भरल्या नंतरच हा वीजप्रकल्प चालू केला जाणार आहे.तो पर्यंत वीज निर्मिती मशीन व यंत्रणेची दुरुस्ती होणार आहे.
