चैतन्य व जय सुतार यांनी बनवली इलेक्ट्रीक सायकल
( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )
कळंब ( वालचंदनगर ), ता.इंदापूर येथील चैतन्य सुतार व जय सुतार या युवकांनी त्यांच्याकडे असलेली साधी जुनी सायकल इलेक्ट्रीक मध्ये परिवर्तीत केली. यासाठी येणारा खर्च अल्प प्रमाणात असून सर्वसामान्यांना परवडेल असा आहे.
‘शिव-कल्याण’ शी बोलतांना चैतन्य व जय सुतार यांनी सांगितले कि, वाढती महागाई व पेट्रोल, डिझेलचे वाढते भाव यामुळे आपण आता इ. सायकल बनवली आहे. इ.सायकल मुळे पैशांची बचत होणार असून, पर्यावरण प्रदुषण रहित राहणार आहे.
अधिक माहितीसाठी 9834950521, 9975810175 या मोबाईल वर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
