इंदापूर तालुक्यातील पुनर्वसित गावातील अडीअडचणी सोडवू – जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख
इंदापूर तालुक्यातील डाळ ज न 2येथे उजनी प्रकल्प बाधित झालेल्या लोकांसाठी पुनर्वसन विभागाकडून प्लॉट(जागा)मिळाल्या आहेत,परंतु या प्लॉट कडे जाणाऱ्या रस्त्यांच्या दिशा निश्चित करण्यात आल्या नसल्याने ये जा करण्यावरून वाद निर्माण झाले आहेत. या प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयाने तातडीने व्यवस्था व नियोजन करावे या मागणीचे निवेदन जिल्हाधकाऱ्यांमार्फत शासनास सादर करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्याचे बहुजन परिषदेचे अध्यक्ष बिभीषण लोखंडे,सचिव श्री विजयकुमार गायकवाड,परिषदेचे राज्य सदस्य संजय राऊत रमेश कुचेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

