कोरोनाविरोधातील लढाईत दिलासा देणारी बातमी ,nलसीच्या दुसऱ्या डोसनंतर संक्रमणांचे प्रमाण कमीnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnजगभरात करोना विषाणूने हाहाकार माजवला आहे.nकरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधक लशींशिवाय दुसरा पर्याय सध्या तरी नाही.nलसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर करोनाची लागण होण्याची शक्यता कमी आहे.nतसेच लागण झाली तरी रुग्ण गंभीर होत नाही.nदरम्यान, भारतात लस घेतलेल्या एकूण २.६ लाख लोकांना करोनाची लागण झाली आहे.nतसेच एक डोस घेतलेल्या लोकांच्या तुलनेत दोन डोस घेतलेल्या लोकांना करोना झाल्याची संख्या कमी आहे,nअशी माहिती सरकारी एजन्सींनी गोळा केलेल्या आकडेवारीतून समोर आली आहे.nही आकडेवारी लसीकरण सुरू झाल्यापासून ते ३ ऑगस्टपर्यंतची आहे.nलसीचा एक डोस घेतलेल्या १.७१ लाख लोकांना करोना झाला.nतर, दोन डोस घेतलेल्या ८७ हजार ४९ लोकांना संसर्ग झाला.nदोन डोस घेतलेले लोक हे लसीचा एक डोस घेतलेल्या लोकांच्या तुलनेत जास्त सुरक्षित आहेत,nअसं या आकडेवातून दिसून येतंय.nदेशभरात आतापर्यंत 53.61 कोटी लोकांचं लसीकरण पूर्ण झालंय.nकेंद्रीय आरोग्य मंत्रालय देशात लसीकरणानंतर झालेल्या ज्या लोकांना संसर्ग झाला,nत्यांची माहिती गोळा करत आहे.nपुढच्या आठवडाभरात यासाठी एक ट्रॅकिंग पोर्टल सुरू केलं जाणार असल्याची माहिती मिळतेय.nमात्र हे पोर्टल लोकांसाठी खुले असेल की नाही याबाबत स्पष्टता नाही.nतसेच विषाणूच्या वेगवेगळ्या व्हेरिएंटची पुष्टी करण्यासाठी विविध राज्यांमधून जीनोम सिक्वेंसिंग केले जात आहे, असे सूत्रांनी सांगितले.