Uncategorized

जलप्रलय!शेकडो लोक पुरात अडकले राज्यात अतिवृष्टीने हाहाकार माजवला

जलप्रलय!शेकडो लोक पुरात अडकले राज्यात अतिवृष्टीने हाहाकार माजवलाnचिपळूण, महाडला पुराचा वेढा;nबदलापूरही जलमय कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात दाणादाण रस्ते, रेल्वे वाहतुकीला फटका;nn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnचिपळूण, महाडला पुराने वेढले असून, त्यात शेकडो नागरिक अडकले आहेत. उल्हास नदीच्या पुरामुळे बदलापूरसह कल्याण तालुक्यातील अनेक गावे जलमय झाली.nकोल्हापूरसह पश्चिाम महाराष्ट्रातील नद्यांनीही धोक्याची पातळी ओलांडल्याने अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली.nविदर्भातही अतिवृष्टीने दाणादाण उडवली.nअतिवृष्टीचा सर्वाधिक फटका चिपळूणला बसला.nबुधवारी रात्रभर झालेली अतिवृष्टी, कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग आणि समुद्राला आलेली भरती या तिन्ही घटनांच्या एकत्रित परिणामाने गुरुवारी चिपळूण शहर जलमय झाले.nचिपळूण मुख्य बाजारपेठेत सकाळी ११ वाजता १० फूट पाणी होते.nशहरातील बहुसंख्य इमारतींचे तळमजले पाण्यात बुडाले असून, काही ठिकाणी पहिल्या मजल्यांवरील घरांमध्येही तीन ते चार फूट पाणी भरले.nअनेक घरांमध्ये छपरापर्यंत पाणी आल्याने शेकडो लोक पाण्यात अडकले.nगुरुवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत तालुक्यात तब्बल २०५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.nवाशिष्ठी आणि शिव नदीला आलेल्या पुराने शहरातील अनेक भागात पाणी साचले असून अंतर्गत मार्ग बंद झाले आहेत.nचिपळूणमध्ये दोन महिला पाण्यात बुडाल्या.nत्यातील एकीचा मृत्यू झाला असून,nदुसरी महिला पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची प्राथमिक माहिती आहे.nपुराच्या पाण्यात असंख्य दुचाकी-चारचाकी गाड्या वाहून गेल्या.nरायगड जिल्ह्यालाही अतिवृष्टीने झोडपले.nसावित्री, गांधारी, काळ आणि नागेश्वरी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने महाड शहराला पुराने वेढा घातला.nबाजारपेठेत आठ ते दहा फूट पाणी होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *