शरद पवार यांना असा मुख्यमंत्री कसा चालतो?nnमाजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा”राष्ट्रवादीवर घणाघात”
nnसचिन तरंगे ( शिव-कल्याण न्यूज नेटवर्क )nnमहाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि राज्य सभेतील खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊनnमुख्यमंत्र्यांनाराज्यातील विविध समस्यांच गांभीर्य नाही. नैसर्गिक आपत्तीमुळे कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांना अजूनही मदत मिळालेली नाही. राज्याचे मुख्यमंत्री कॅबिनेटला जात नाहीत. पत्रकार परिषद घेत नाही. अधिवेशनही अल्पकालावधीचं घेतात. शरद पवार यांना असा मुख्यमंत्री कसा चालतो?, असा सवाल भाजप नेते नारायण राणे यांनी केला आहे.nnनारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन थेट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनाच हा सवाल केला आहे.nnलोकसभेचं अधिवेशन हे 19 जुलै ते 13 ऑगस्टपर्यंत होणार आहे. महाराष्ट्रात मात्र फक्त दोनच दिवसांचं अधिवेशन घेण्यात आलं आहे.nnमहाराष्ट्र राज्याचं पाच व सहा जुलै रोजी होणार अधिवेशन नसून केवळ तीन पक्षांचं अधिवेशन आहे, अशी टीका राणेंनी केली.nnराणे पुढे म्हणाले की,वाघ म्हणणारे कोल्ह्यासारखे पळालेnमहाराष्ट्रातले जटील प्रश्न आहेत. गंभीर प्रश्न असताना सरकार दोन दिवसांचं अधिवेशन घेऊन पळ काढत आहे.nnअधिवेशनाच्या आधी मुख्यमंत्री पत्रकार परिषद घेत असतात. ते मात्र पळून गेले. त्यांना कोणतंही गांभीर्य नाही. त्यामुळेच दोन दिवसांचं अधिवेशन ठेवलं आहे.nnएका बाजुला स्वत:ला वाघ म्हणवून घ्यायचं आणि दुसरीकडे कोल्ह्यासारखा पळ काढायचा, असा हल्लाबोलही त्यांनी मुख्यमंत्र्यांवर केला.nnअनेक आमदार भाजपच्या संपर्कात -nnआमच्या संपर्कात अनेक आमदारnआमदारांच्या निलंबनावरूनही राणे यांनी मोठं विधान केलं. सरकार वाचवण्यासाठी त्यांनी 12 आमदारांना निलंबित केलंय. त्यांनी आमच्या बारा आमदारांचं निलंबन केलं असलं तरी त्यांचे अनेक आमदार आमच्या संपर्कात आहे, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला.nमोदींची भेट कशासाठी?nमोदीं- ठाकरे भेटीत “ओबीसींचा डेटा वर का चर्चा केली नाही,असा सवाल करीत राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेवर “मोदी ठाकरे “भेटीतून काय साधले असा सवाल केला.nओबीसींचा इम्पिरीकल डेटा केंद्र सरकारने दिला नाही म्हणून अधिवेशनात ठराव करता मग मोदींशी 50 मिनिटं कसली चर्चा करत होता? आपल्या घरातील सदस्यांवर, पक्षातील नेत्यांवर कारवाई करू नका म्हणून ही चर्चा होती का? असा सवाल त्यांनी केला.nnसरकार पुत्र आदित्य करीता -nnसरकार फक्त आदित्य ठाकरेंसाठी चाललं आहे. आदित्य सांगेल त्याच फायलीवर मुख्यमंत्री सही करत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.