Uncategorized

मुख्यमंत्र्यांचा काँग्रेसला इशारा! सरकार चालविणे एकट्या शिवसेनेची जबाबदारी नाही

मुख्यमंत्र्यांचा काँग्रेसला इशारा!nसरकार चालविणे एकट्या शिवसेनेची जबाबदारी नाहीnnसचिन तरंगे (शिव-कल्याण न्यूज नेटवर्क)nnराज्यातील महा विकास आघाडी सरकार हे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुढाकाराने स्थापन झाले आहे,त्यामुळे हे महा विकास आघाडीचे सरक्रा टिकविणे व चालविणे एकट्या शिवसेनेची जवाबदारी नाही अशी स्पटोक्ती राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्या समोर केली.nकाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पक्ष प्रमुख शरद पवार यांची भेट पवार यांच्या “सिल्व्हर ओक”या निवास्थानी भेट घेतली,त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट शब्दात शरद पवारांजवळ नाराजी व्यक्त केली.nnराज्यमंत्री मंडळातील मंत्री मुख्यमत्र्यांविरोधात जाहीर बोलतात, मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्री चढ्या आवाजात बोलतात,nहे योग्य नाही,nnकांग्रेस मुळे राज्यसरकार आहे,काँग्रेसच्या पाठिंब्यावर सरकार आहे हे लक्षात ठेवावे असा सणसणीत इशारा काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला होता.त्यामुळे ठाकरे या सतत च्या आरोप प्रत्यारोप मुळे नाराज झाले आहे त.nnराज्यमंत्री मंडळातील मंत्री हे मंत्री मंडळाच्या बैठकीत झालेले निर्णय मुख्यमंत्र्याच्या अगोदर मंत्री प्रसिध्दी माध्यमांसमोर जाहीर करत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज होत होते.त्यामुळे मंत्रीमंडळातील बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांना मातोश्रीवर जावे लागत होते.nnशरद पवार व मु ख्यमंत्री यांच्यातील बैठकीत उद्धव ठाकरे यांनी आघाडी सरकार मधील काही मंत्री व काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.nnकाँगेसची सतत राज्यसरकार विरोधी वक्तव्ये:-nnराज्यात महा विकास आघाडी सरकार अस्तित्वात आले पासून काँग्रेस सतत आक्रमक आहे.किमान समान कार्यक्रम राबविण्यात यावा,या मुद्यावर ठाम आहे,परंतु राज्याचे उपुख्यमंत्री अजित पवार हे पदोन्नती आरक्षण, सारथी संस्था यात सतत हस्तक्षेप करत आहेत.nत्यामुळे काँग्रेस राज्यसरकार नाराज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *