जलसंपदा विभागाच बंद करून टाका!
nnराज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्री जयंत पाटील व मुख्य सचिव सीताराम कुटे यांच्यात घमासान..nनिशाणा मात्र अजित दादांवर!nnसचिन तरंगे (शिव कल्याण न्यूज नेटवर्क)nnसंपादकीयnnगेल्या आठवड्यात राज्य मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली.राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपुख्यमंत्र्यासह विविध विभागांचे मत्री,राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे उपस्थित होते.राज्याचं जलसंपदा विभाग जयंत पाटील यांच्याकडे आहे तर वित्त विभाग अजित पवार यांच्याकडे आहे.nराज्यातील अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी निधीचा प्रस्ताव तयार केला होता.त्या प्रस्तावाच्या फाईलवर “वित्त विभागाची”मान्यता हवी या करीता ती फाईल वित्त विभागाची मंजुरी पुन्हा घेण्यासाठी ती फाइल राज्याच्या मुख्य सचिवांनी उपुख्यमंत्री अजित पवार यांच्या वित्त विभागाकडे पाठविण्यात आली.राज्याच्या अर्थ संकल्पात जलसंपदा ला निधी मंजूर केल्यानंतर मुख्य सचिवांनी ती फाईल पुन्हा मंजुरी साठी वित्त विभागाकडे पाठविणे योग्य नसल्याचे सांगत बैठकीत संताप व्यक्त केला होता,त्यांचा हा अचानकपणे झालेला रूद्र अवतार पाहून मंत्रिमंडळ अवाकच झाले होते.nसाधारणतः विलासराव देशमुख हे राज्याचे मुख्यमंत्री होते,त्यांच्या समोर असाच काहीसा वाद झाला होता.आणि तो ही अजित पवार व जयंतराव पाटील याच्यातच.आजित पवार यांच्या कडे त्यावेळी जलसंपदा विभाग होता,ते त्या विभागाचे मंत्री होते तर जयंत पाटील यांच्याकडे राज्याचं वित्त विभाग होता,वित्त विभागाचे मंत्री होते.nगेल्या आठवड्यात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत जलसंदामंत्री जयत पाटील यांच्या जलसंपदा विभागाच्या फाईली वित्त विभागाकडे पाठविण्यात आल्या,त्यामुळे मंत्री जयंत पाटील यांनी संताप व्यक्त केला होता त्याच प्रकारे विलासराव देशमुख राज्याचे मुख्यमंत्री असताना जलसंदामंत्री अजित पवार यांच्या जलसंपदा विभागाच्या फाईली अर्थ संकल्पात तरतूद केली असताना मान्यतेसाठी जयंत पाटील यांच्याकडे असणाऱ्या वित्त विभागाकडे पाठविण्यात येत होत्या, त्यानंतरच पुढील कार्यवाही जलसंपदा विभागा ला करता येत होती.त्यावेळी अजित पवारांचा या राज्य मंत्रिमडळा च्या बैठकीत “संताप”व्यक्त करीत बैठकीतून अजित पवार बाहेर पडले होते.nराज्याच्या मंत्रिमडळातील या वादावर राज्यात चर्चेचा रणसंग्राम चालूच आहे.