Uncategorized

आता जनतेवर अन्याय होणार नाही – हर्षवर्धन पाटील

आता जनतेवर अन्याय होणार नाही- हर्षवर्धन पाटीलnजनतेच्या मनातील सरकार सत्तेवर, निरवांगी येथे नंदिकेश्वराचे घेतले दर्शनnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnइंदापूर, प्रतिनिधी दि.8/8/22 :nआपण मंत्रीपदावर असताना 20 वर्षात कधीही कोणावर अन्याय केला नाही. मात्र इंदापूर तालुक्यात गेल्या अडीच वर्षात गावागावातील जनतेवर, कार्यकर्त्यांवर वेगवेगळ्या माध्यमातून अन्याय झाला आहे. राज्यात आपले भाजप-शिवसेना सरकार सत्तेवर आले आहे. त्यामुळे आता कोणावरही अन्याय होणार नाही, असे असे प्रतिपादन भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सोमवारी (दि.8) केले.nनिरवांगी येथील प्राचिनकालीन प्रसिद्ध श्री नंदिकेश्वर मंदिरात हर्षवर्धन पाटील यांनी पूजा करून दर्शन घेतले. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात हर्षवर्धन पाटील बोलत होते. ते म्हणाले, इंदापूर तालुक्यातील विकास कामांसाठी लागेल तेवढा निधी भाजप-शिवसेना सरकार कडून दिला जाईल. आता जनतेच्या मनातील सरकार राज्यात सत्तेवर आले आहे, त्यामुळे इंदापूर तालुक्यात सर्वांगीण विकासाचे नवे पूर्व सुरू होत आहे.nमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आंम्ही भेटून 50 हजार रुपये अनुदान देण्यासाठी शेतकऱ्यांना यापूर्वीच्या सरकारने घातलेल्या जाचक अटी ह्या नवीन जीआर काढून दूर केल्या आहेत. त्यामुळे राज्यातील 14 लाख शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. गेल्या अडीच वर्षात तालुक्यात एकही नवीन उद्योग धंदा आला नाही, एकाही युवकांना रोजगार मिळाला नाही, एकही नवीन संस्था उभारणी झाली नाही किंवा एकही नावीन्यपूर्ण काम झाले नाही. रस्त्याची जी विकास कामे झाली त्याचा दर्जा तुम्हाला माहित आहे. शासनाच्या आलेल्या निधीचा योग्य विनियोग करावयाचा असतो, पण तसे काम इंदापूर तालुक्यात झाले नाही, असे भाषणात हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केले.nइंदापूर तालुक्यातील गावागावातून विकास कामांची प्रस्ताव शासनाकडे पाठवून निधी दिला जाईल. निरवांगी, दगडवाडी साठी निधी कमी पडू देणार नाही. आठ दिवसांपूर्वी जलसंपदा अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन नीरा नदीवर बंधारे दुरुस्ती, बंधाऱ्यात पूर्ण क्षमतेने पाणी अडविणे या संदर्भात 3 तास चर्चा झाली असून शेतकऱ्यांना पाणी कमी पडू दिले जाणार नाही. मी सत्तेवर असताना 22 गावांसाठी 7 नंबर फॉर्मवर पाणी दिले आहे, तसेच सणसर कट पुनर्जीवित करावा लागेल, असे त्यानी भाषणात स्पष्ट केले. सर्व जनतेला सुखी समाधानी राहू दे, असे साकडे नंदिकेश्वर चरणी घातल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. यावेळी नाना पोळ, महादेव कवितके यांची भाषणे झाली. कार्यक्रमास परिसरातील गावा-गावातील पदाधिकारी, भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *