Uncategorized

पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत “उमेदवारी अर्ज बाद”करण्याचे डावपेच व व्यूहरचना

पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत “उमेदवारी अर्ज बाद”करण्याचे डावपेच व व्यूहरचना!nnसचिन तरंगे ( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnपुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू आहे. अनेक दिग्गज नेते ‘अ’ आणि ‘ब’वर्गातून उमेदवारी अर्ज दाखल करीत आहे,nnउमेदवारी अर्ज दाखल करताना ‘सूचक’याना विशेषतः केंद्रित केले आहे.nnया पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान संचालक व महाराष्ट्र सरकार मधील सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी चार उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत,nnविशेष म्हणजे या बँकेचे विद्यमान अध्यक्ष रमेश थोरात यांनीही राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रमाणे चार अर्ज दाखल केले आहेत.nnतसेच विद्यमान संचालक संजय काळे यांनी सात नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहेत.nnप्रतिस्पर्धी उमेदवाराला ‘सूचक’मिळू नये म्हणून आणि प्रस्थापित उमेदवार हे प्रतिस्पर्धी उमेदवाराला मिळतील,अशा मतदारांचा शोध घेण्याचे काम हे या क्षेत्रातील दिगग्ज करीत आहेत.nnत्यांच्यावर ही ‘राजकीय कोंडीची’व्यूहरचना सोपविण्यात आली असल्याचे समजते.अशातच अशा मतदारचा शोध घेऊन त्यांच्याकडून ‘सूचक’म्हणून स्वतःच्या उमेदवारी अर्जावर सह्या घेत आहेत.nnदोन उमेदवाराना एकानेच सूचक म्हणून सही दिल्यास त्याचे उमेदवारी अर्ज बाद होतात, त्या कारणाने जास्तीत जास्त उमेदवारी अर्ज भरुन ‘सूचक अडकवून’ ठेवण्याचा नियोजनबद्ध ‘राजकिय प्लॅन’सुरू झाला आहे.nnत्यामूळे कोनाची विकेट जाईल याकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.nnनवीन सहकार कायद्याचा गैरफायदा घेत सहकार क्षेत्रात कार्यरत असलेल्या दिग्गज संचालकांनी ‘उमेदवारी अर्ज’बाद करण्याचे “राजकीय डावपेच”सुरू केले आहे.nnसहकारात एका उमेदवाराने किती अर्ज दाखल करावेत याचे बंधन नसल्याने प्रस्थापित उमेदवारांकडून प्रतिस्पर्धी उमेदवाराला सूचक मिळू नये म्हणून यासाठी जास्तीत जास्त अर्ज दाखल करण्याचा “नवा राजकिय फंडा” सुरू झाला आहे.nnयामुळे या निवडणुकीत एकाच उमेदवाराने चक्क एकावन्न उमेदवारी अर्ज विकत घेतले आहेत.nnत्यामुळे प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या विकेट लवकरच पडणार असल्याचे दिसत आहे.nnराज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था किंवा लोकसभा, विधानसभा निवडणुकीत एका उमेदवाराला जास्तीत जास्त चार उमेदवारी अर्ज भरता येतात हा एक नियम आहे परंतु सहकारी संस्थांच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कोणतीही मर्यादा नाही.nnत्याचा गैरवापर उमेदवार करू लागले आहेत हे स्पष्ट होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *