Uncategorized

राज्य मंत्रिमंडळाच्या इतिहासात 4 तर केंद्रीय मंत्रिमंडळातील 1मंत्र्यास अटक!

राज्य मंत्रिमंडळाच्या इतिहासात 4 तर केंद्रीय मंत्रिमंडळातील 1मंत्र्यास अटक!nnसचिन तरंगेn(शिव-कल्याण न्युज नेटवर्क)nnराज्याच्या व केंद्राच्या राजकीय इतिहासात मंत्रिमंडळात अनेक मातब्बर राजकीय नेते कॅबिनेट व राज्य मंत्री आहेत.व होते.यातील काही नेत्याची राजकीय कारकीर्द वादग्रस्त ठरली.nnआतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा च्या राज्य मंत्रिमंडळातील 4 मंत्री तर भाजप च्या एका केंद्रीय मंत्रिमंडळातील नेत्यांना अटक झाली असल्याचे समोर आले आहे.nnया मध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उस्मानाबाद जिल्हा चे नेते व राज्याचे उमुख्यमंत्री अजित पवार यांचे जवळचे नातेवाईक पदमसिह पाटील .nनवी मुंबईतील कळंबोली येथे पवनराजे निंबाळकर यांची ३ जून २००६ रोजी गोळ्या झाडून हत्या झाली. या प्रकरणात सीबीआयने माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे तेव्हाचे नेते पद्मसिंह पाटील यांना २००९ मध्ये अटक केली होती. सध्या ते जामिनावर आहेत. मुंबईत सेशन कोर्टात केस अद्याप सुरू आहे.nnराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दुसरे व सद्या राज्य मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री व माजी सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री असताना भुजबळांवर महाराष्ट्र सदन बांधकामात घोटाळा केल्याच्या आरोप झाला.याप्रकरणी अटक झाली. दोन वर्ष जेलमध्ये राहावे लागले. कोर्टाने दोषमुक्त केले पण सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कोर्टाच्या आदेशाला वरच्या कोर्टात आव्हान देणार असल्याचे जाहीर केले.nnराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तिसरे मंत्री जितेंद्र आव्हाड – घोडबंदर भागात राहणारे सिव्हिल इंजिनिअर अनंत करमुसे यांचे अपहरण करून त्यांना स्वतःच्या बंगल्यावर आणून पोलिसांकरवी बेदम मारहाण केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर आहे. या प्रकरणी आव्हाडांना वर्तकनगर पोलिसांनी अटक केली. ठाणे कोर्टाने जामीन दिला.nnराज्याचे माजी मुख्यमंत्री व व सध्या केंद्रीय मंत्रिमंळातील कॅबिनेट मंत्री नारायण राणे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी नाशिकमध्ये गुन्हा दाखल झाल्यावर केंद्रीयमंत्री आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना अटक झाली. एक दिवसानंतर त्यांना जामीन देण्यात आला होता.nnराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चौथे मत्री, माजी गृह मंत्री अनिल देशमुख – विशेष पीएमएलए कोर्टाने खंडणी वसुली आणि पैशांची अफरातफर या प्रकरणात महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनिल देशमुख यांना ६ नोव्हेंबरपर्यंत ईडीची कोठडी दिली. याआधी ईडीने त्यांना सोमवार-मंगळवार (१ आणि २ नोव्हेंबर २०२१ दरम्यान) दरम्यान मध्यरात्री अटक केली.nअसा अटक करण्यात आलेल्या मंत्र्याचा इतिहास आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *