राजू शेट्टींच्या आंदोलनाची सरकारकडून दखल!;
पूरग्रस्तांच्या प्रश्नांवर उद्या मुख्यमंत्र्यासोबत होणार बैठक
( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )
पूरग्रस्तांना पुरेशी मदत मिळाली नाही असा आरोप करत, पूरग्रस्तांना तातडीने पुरेशी मदत देण्यात यावी.
या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी सुरू केलेल्या पंचगंगा परिक्रमा यात्रेची आज नृसिंहवाडीत सांगता झाली.
तर, त्यांच्या या आंदोलनाची राज्य सरकारकडून दखल घेण्यात आली आहे.
कारण, पूरग्रस्तांचे प्रश्न आणि मागण्यांचे निराकरण करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्या सोमवार राजू शेट्टी यांच्या समवेत बैठकीचे आयोजन केले आहे.
असे मुख्यमंत्र्यांचे पत्र आज नृसिंहवाडी येथे राजू शेट्टी यांना प्रशासनाकडून सर्वांच्या समक्ष देण्यात आले.
इचलकरंजीचे प्रांताधिकारी
डॉ. विकास खरात यांनी राजू शेट्टी यांना मुख्यमंत्र्यांचे हे पत्र सादर केले.
दरम्यान, या अगोदर नृसिंहवाडी येथे जलसमाधी घेणार असल्याचा इशारा देखील राजू शेट्टी यांनी दिलेला होता.
त्यानुसार आज काही कार्यकर्त्यांनी नदीपात्रात उड्या देखील मारल्या मात्र त्यांना पोलिसांनी तत्काळ बाहेर काढले. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हजारो कार्यकर्ते आणि शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते.
तर, नृसिंहवाडी येथे सभा सुरू होण्यापूर्वी इचलकरंजीचे प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांनी राजू शेट्टी यांची भेट घेऊन त्यांना मुख्यमंत्री ठाकरे यांचे पत्र सादर केले.
त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्तांच्या प्रश्नासाठी राजू शेट्टी यांच्यासमवेत उद्या दुपारी तीन वाजता वर्षा शासकीय निवासस्थानी बैठकीचे आयोजन केले असल्याचे नमूद केलेले आहे.
