अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ!nमे.सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा नाहीnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnमहाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत आणखी वाढ होतांना दिसत आहे.nमनी लाँडरिंग प्रकरणात देशमुख यांना मे.सुप्रीम कोर्टाकडूनही दिलासा मिळालेला नाही.nदेशमुख यांनी दाखल केलेली याचिका मे.सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.nई.डी.ने नोंदवलेल्या मनी लाँडरिंग प्रकरणात कोणत्याही जबरदस्तीच्या कारवाईपासून संरक्षण मागितले होते.nअटकेची कारवाई टाळण्यासाठी मे.सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.nया प्रकरणाबाबत मे.सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की कायदेशीर उपाय फक्त कायदेशीर तरतुदींनुसारच करता येतात.nसक्त वसुली संचालनालयाने (ई.डी.) अनिल देशमुख यांच्यावर कारवाईचा भडीमार सुरु ठेवला आहे.nयामध्ये त्यांची मालमत्ता देखील जप्त करण्यात आली आहे.nजी त्यांच्या आणि कंपनीच्या नावावर होती.nयाप्रकरणी आपल्यावर कुठलीही कठोर कारवाई म्हणजेच ई.डीे.ने अटक करु नये,nयासाठी अनिल देशमुख यांनी मे.सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.nयावेळी इतर उपलब्ध पर्यांयाचा देशमुख यांनी वापर करावा,nअसे मे.सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.nअनिल देशमुख आणि त्यांच्या मुलाला अंमलबजावणी संचालनालयाने मनी लाँडरिंग प्रकरणात अनेक वेळा समन्स बजावले होते.nअनिल देशमुखांना आता अटक टाळायची असेल तर त्यांनी रीतसर अटकपुर्व जामीनाठी मे.कोर्टात याचिका दाखल करावी.nत्यावर मुंबईतील मे.स्थानिक न्यायालय निर्णय घेते.nआम्ही तुम्हाला कुठलाही दिलासा देऊ शकत नाही,nअसे मे.न्यायालयाने सांगितले आहे.