पावसाचा तडाखा! पूल गेला वाहून, चालकाचा मृत्यू;nउसरोली नदीला पूरnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnरायगड जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली.nजिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाचा तडाखा बसला असून,nसरासरी ८८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.nमुरुड तालुक्यात अतिवृष्टी झाली असून,nतालुक्यात २४ तासांत तब्बल ३४८ मिलीमीटर पाऊस पडला.nअतिवृष्टीमुळे काशिद येथे पूल वाहून गेला असून,nया दुर्घटनेत एक वाहन चालक वाहून गेला आहे.nत्याचबरोबर राजपूरी आणि कळवटे येथे दरड कोसळल्याची घटना घडली आहे.nतर उसरोली नदीलाही पूर आल्याने सुपेगाव मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.nजिल्ह्यात सकाळपासून पावसाला सुरुवात झाली.nकिनारपट्टीवरील भागात पावसाचा जोर दिसून येत आहे.nमुरुड, श्रीवर्धन तालुक्यात पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे.nमुरुड येथे ३४८ मिमी,nश्रीवर्धन येथे २१० मिमी,nमाथेरान येथे २१४ मिमी,nतर तळा येथे १३१ मिमीnपावसाची नोंद झाली आहे.nमुरुड तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अलिबाग मुरुड मार्गावरील जुना पूल रात्री वाहून गेला.nयात पुलावरील वाहनंही वाहून गेली.nरायगड जिल्ह्यात सोमवारी पावासाने जोरदार हजेरी लावली.nमुरुड तालुक्यात अतिवृष्टी झाली असून,nतालुक्यात २४ तासांत तब्बल ३४८ मिलीमीटर पाऊस पडला.nराजपूरी आणि कळवटे येथे दरड कोसळल्याची घटना घडली आहे.nया दुर्घटनेत एकदरा येथील विजय चव्हाण यांचा मृत्यू झाला.nतर अन्य सहा जणांचे जीव थोडक्यात बचावले.nरोहा तालुक्यात केळघर रोडवर कळवटे आदिवासी वाडीजवळ दरड कोसळली.nत्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद पडली आहे.nराजपुरी येथे एका झोपडीवर दरड कोसळली.nसुदैवाने यात कोणीतीही जीवितहानी झाली नाही.