व्यापाऱ्यांचा प्रयत्न प्रशासनाकडून मोडीत…..निर्बंध कायमnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnसांगली : प्रशासनाने वेळीच खबरदारी घेतल्याने सांगली महापालिका क्षेत्रामध्ये सर्वच व्यापारी आस्थापना सुरू करण्याचा प्रयत्न मोडीत निघाला.nसमाज माध्यमातून अत्यावश्यक नसलेली व्यापारी आस्थापने सुरू करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला होता.nसांगली शहर पोलीस ठाण्यात व्यापारी प्रतिनिधी आणि प्रशासन यांची संयुक्त बैठक झाल्यानंतर प्रशासनाने मान्यता दिल्यानंतरच दुकाने खुली करण्याचा मनोदय व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.nव्यापारी महासंघाच्या नावाने निर्बंध झुगारून सकाळी दहा ते सायंकाळी चार या वेळेत सर्व दुकाने खुली करण्याचा निर्धार व्यक्त केल्याचा संदेश समाज माध्यमातून प्रसारित झाला होता.nया अनुंषगाने अत्यावश्यक सेवेमध्ये समाविष्ट नसलेली दुकानेही सुरू करण्याचा प्रयत्न होता.nयामध्ये प्रामुख्याने कापड दुकानांचा समावेश होता.nमात्र तत्पूर्वी शहर पोलीस ठाण्यामध्ये पोलीस, महापालिका आणि व्यापारी प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक झाली.nनिर्बंध शिथिल होईपर्यंत दुकाने उघडू नयेत असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले.याला सर्वच व्यापाऱ्यांनी सहमती दर्शवली.nकोरोना संसर्ग रोखण्यासाठी गर्दी टाळणे महत्त्वाचे असल्याने व्यापारी वर्गाने सहकार्य करावे,nअशी भूमिका प्रशासनाच्यावतीने मांडत असताना नियमभंग करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असेही सुनावण्यात आले.nकोरोना विरूध्दच्या लढ्यामध्ये व्यापारी वर्गाची भूमिका महत्त्वाची आहे.nपालकमंत्री जयंत पाटील यांच्या सहकार्याने लवकरात लवकर निर्बंध हटविण्यात येतील तोपर्यंत व्यापारी वर्गाने संयम बाळगावा,nअसे आवाहन माजी नगरसेवक शेखर माने यांनी केले.