Uncategorized

कृषिदूतांनी सांगितले माती परीक्षणाचे महत्व

कृषिदूतांनी सांगितले माती परीक्षणाचे महत्वnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnscreenshot 20241212 100437 photosnnलाखेवाडी (ता. इंदापूर) येथील शेतकऱ्यांना माती परीक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी बारामती कृषी महाविद्यालयातील कृषिदुतांनी गावातील शेतीला भेट दिली. त्यांनी शेतातून मातीचे नमुने गोळा केले आणि मातीची गुणवत्ता आणि पोषक घटक गोळा करण्याची आणि विश्लेषण करण्याची प्रक्रिया शेतकऱ्यांना दाखवली.nnकृषिदुतांनी स्पष्ट केले की माती परीक्षणामुळे जमिनीतील पोषक तत्वांची कमतरता ओळखण्यास मदत होते आणि योग्य खत व्यवस्थापनासाठी मार्गदर्शन मिळते, शेवटी पीक उत्पादनात वाढ होण्यास मदत होते. या उपक्रमाला शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.nnकार्यक्रमादरम्यान लाखेवाडी गावातील शेतकऱ्यांनी माती परीक्षण प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी माती परीक्षणाच्या पद्धती, नमुना संकलनाचे योग्य तंत्र, नमुन्यांचे शास्त्रीय विश्लेषण याबाबत सविस्तर माहिती दिली.nnबारामती कृषी महाविद्यालयाच्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये माती परीक्षणाबाबत जागरुकता निर्माण होऊन त्यांच्या पीक उत्पादनात फायदा होईल, अशी अपेक्षा उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केली.कृषिदूत अथर्व साळुंखे, प्रतिक मोरे, आनंद धर्माळे, प्रतिक सदाफळ,श्रेयस भोसले, रुद्र कुतवळ , अनुराग वळवी, वेंकट वैभव यांनी प्रात्यक्षिक करून दाखवले.या सर्व उपक्रमांना त्यांना कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. पी. गायकवाड आणि प्रा. एस. व्ही. बुरुंगले यांचे मार्गदर्शन या कृषिदुतांना होत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *