स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ व समाधी स्थळ विकास आराखड्याच्या नावात अंशत: बदल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसnnशिव-कल्याण न्युज नेटवर्कnnमुंबई, दि. 2 : स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे पुणे जिल्ह्यातील बलिदान स्थळ मौजे तुळापूर ता. हवेली व समाधी स्थळ स्मारक वढू (बु.) शिरूर येथील विकास आराखड्यास नियोजन विभागाने दि. २८ जून २०२२ च्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. या विकास आराखड्याच्या नावामध्ये अंशतः बदल करण्यात आला असल्याचे निवेदन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विधान परिषद नियम 46 अन्वये विधान परिषदेत केले.nnया विकास आराखड्याच्या नावात अंशतः बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला असून सुधारित नाव ‘स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ मौजे तुळापूर, तालुका हवेली व समाधी स्थळ स्मारक वढू (बु.), शिरूर, जि.पुणे विकास आराखडा, असे निश्चित करण्यात आले आहे, असे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.nn*****
Related Posts
महापुरूष जयंतीदिनी वायफळ खर्च टाळुन मतिमंद विद्यार्थ्यांना दीले स्नेहभोजन
महापुरूष जयंतीदिनी वायफळ खर्च टाळुन मतिमंद विद्यार्थ्यांना दीले स्नेहभोजन nबारामती तालुका फुले प्रहारचा स्तुत्य उपक्रमnn(…
मौजे रेडणी (ता इंदापूर) येथे महाराष्ट्र शासनाच्या मृद वं जलसंधारण विभाग वं महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ अंतर्गत ‘गेटेड साठवण दोन बंधारे ‘बांधणे या कामाचे भूमिपूजन संप्पन्न
nपुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्रीमंत ढोले यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष हनुमंत…
आघाडी सरकार मधील मंत्रीच आरक्षणाचा वाद पेटवताहेत! गोपीचंद पडळकरांचा सरकार वर घणाघात.
आघाडी सरकार मधील मंत्रीच आरक्षणाचा वाद पेटवताहेत!nnगोपीचंद पडळकरांचा सरकार वर घणाघात.nnसचिन तरंगे (शिव-कल्याण न्यूज नेटवर्क)nnnमहाराष्ट्र…