भाजप मध्ये आल्यापासून सगळ निवांत,चौकशी वगैरे काही नाही. शांत झोप लागते!nमाजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे वक्तव्य
nnसचिन तरंगेn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnकेंद्र सरकार व भारतीय जनता पक्षाकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरू असल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून वारंवार करण्यात येतो.अश्या आरोप प्रत्यारोप च्या फेऱ्या जोरात सुरू आहेत,या मुळेच राज्याचे राजकारण तापले असतानाच भाजपकडून कायम या आरोपांचा इन्कार केला जातो.nnत्यात आता भारतीय जनता पक्षाचे नेते व माजी मंत्रीहर्षवर्धन पाटील यांनी केलेल्या एका विधानाची सध्या सर्वत्र चर्चा आहे.nत्यांचे हे विधान “ब्रेकिंग न्यूज”झाले आहे,महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन चर्चेला उधाण आले आहे.nत्यात आता भारतीय जनता पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी केलेल्या एका विधानाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. पाटील यांनी दोनच वर्षांपूर्वी काँग्रेसचा हात सोडून कमळ हाती घेतलं.nnहर्षवर्धन पाटील यांनी काल मावळमधील एका कार्यक्रमात एक महत्त्वाचं वक्तव्य केलं. आपण काँग्रेस सोडून भाजपमध्ये का आलो, या प्रश्नाचं उत्तर यावेळी पाटील यांनी दिलं. या कार्यक्रमाला विधान परिषदेचे नेते प्रविण दरेकर, माजी मंत्री बाळा भेगडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके उपस्थित होते.nnआम्हाला भारतीय जनता पक्षात जावं लागलं. स्टेजवर एकानं बसल्या बसल्या विचारलं भाजपमध्ये का गेलात..? मी त्यांना म्हटलं, हे मला विचारण्यापेक्षा आपल्या नेत्याला विचारा हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये का गेला? सध्या सगळं मस्त आहे, निवांत हा आहे. चौकशी वगैरे काही नाही. शांत झोप लागते असं पाटील म्हणाले.nमाजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.