गुन्हेगारांवर वचक बसवा!nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पोलिसांना आदेशnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )
nnमुंबई : माता-भगिनींची टिंगल-टवाळी खपवून घेतली जाणार नाही.nत्यांच्या सुरक्षेसाठीच्या उपाययोजनांबाबत तडजोड केली जाणार नाही.nत्यासाठी पोलिसांना पूर्ण पाठबळ देण्यात येईल.nअत्याचार करणाऱ्या नराधमांना वचक बसावा यासाठी आवश्यक ती कारवाई करा,nअसा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिसांना दिला.nमहिला आणि बालकांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने आयोजित गृह विभागाच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते.nपोलीस महासंचालक कार्यालयात झालेल्या या बैठकीस गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील यांच्यासह पोलीस अधिकारी उपस्थित होते.nराज्यातील महिला सुरक्षेबाबत धोरण म्हणून कोणते प्रयत्न करता येतील,nयाचा विचार करावा लागेल.nपदपथ, रेल्वेस्थानक, बसस्थानक अशा ठिकाणी आसरा घेणाऱ्या महिलांसाठी किमान रात्रीच्या निवाऱ्यासाठी सोय करता येईलnका ?nयाबाबत केंद्राच्या सहकार्याने प्रयत्न करावे लागतील.nसुविधांचा अभाव राहू नये यासाठी मूलभूत बाबींकडे धोरण म्हणून लक्ष द्यावे लागेल.nअनेक घटनांमध्ये तपास केंद्रीय यंत्रणांकडे द्या,nअशी मागणी केली जाते.nअशा अनेक प्रकरणातील तपास आपण सक्षमपणे केला आहे.nत्यामुळे अशा प्रतिक्रियांमधून पोलिसांचे नीतिधैर्य, मनोबल यांचे खच्चीकरण होऊ नये याची जबाबदारी सर्वांनाच घ्यावी लागेल.nमहिला अत्याचारातील नराधमांना वचक बसेल,nअशा कारवाईतून आणि शिक्षेतून त्यांना इशाराही द्यावा लागेल.nत्यासाठी पोलिसांच्या सर्व प्रयत्नांना सरकार म्हणून सर्व ते पाठबळ दिले जाईल.nराज्याच्या शक्ती कायद्याबाबतचा संयुक्त समितीचा अहवाल, आगामी विधिमंडळ अधिवेशनात सादर केला जाईल,nअसे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले.nजलदगती न्यायालयांतून निकाल लागतो.