नारायण राणे ना केंद्रीय मंत्रिमंडळात घेण्यामागे “भाजपचा मास्टर प्लॅन !
महाराष्ट्रातून राणेच का?
सचिन तरंगे (शिव-कल्याण न्यूज नेटवर्क )
जून महिन्यात मोदी सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार निश्चित मानला जातो आहे. तोही पुढच्या काही दिवसातच होईल अशी “राजकीय ब्रेकिंग” चर्चा दिल्ली वर्तूळात आहे.
महाराष्ट्राच्या एका नेत्याची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागली तर या मंत्रिमंडळात नेमका कोणाचा समावेश होईल,याबाबत राज्याच्या राजकारणात बीड च्या खासदार प्रीतम मुंडे किंवा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या नावाची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात चर्चेला आहे
राज्यातील व देशातील राजकीय व जातीय समीकरणे पाहता, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना खरंच केंद्रीय मंत्री केलं तर त्या पाठीमागे भाजपाचं नेमकं गणित व “राजकीय मास्टर प्लॅन” काय असू शकतो यबद्दल राजकीय अभ्यासक वेगवेगळा आंदाज व्यक्त करत आहेत.
राज्यातील आक्रमक मराठा चेहरा म्हणून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्याकडे पहिले जाते,राज्यात 1995साली युतीचे सरकार आले,त्यावेळी शिवसेना प्रमुखांनी मनोहर जोशी यांना मुख्यमंत्री केले,त्यावर प्रतिक्रिया देताना माजी मुख्यमंत्री शरद पवार यांनी राज्यात “पेशवाई”आली असा सणसणीत टोला लगावला होता,मराठा समाजाची पुढील विधानसभेला मते घेन्याकरिता शिवसेना प्रमुखांनी नारायण राणे यांना 1998 साली मुख्यमंत्री केले,तोच हेतू केंद्रीय नेतृत्वाचा व राज्यातील कार्यकारणी चा दिसून येत आहे.
महाराष्ट्रातला मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे,सर्वच
राजकीय पक्ष व त्यांचे प्रमुख ,”मराठा आरक्षण”या मुद्यावर 2024 ची महाराष्ट्राची विधानसभा या मुद्यावर होणार आहे.
मराठ्यांचे आक्रमक नेतृत्व👉
नारायण राणे यांना मराठा आरक्षणाचा दांडगा आभ्यास आहे. या मुद्यावर त्यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे ,तर कधी राष्ट्रपतीनियुक्त खासदार तथा कोल्हापूर चे छत्रपती संभाजी राजे चे यांनाही “मराठा आक्षणासंदर्भातीलगळपेची
“भूमिकेमुळे त्यांच्यावर राजकीय टीकास्त्र सोड न्यावर मागे पुढे पहिले नाही,ही आक्रमक भूमिका केवळ राणेचं घेऊ शकतात,असा राजकीय दरारा असणारा नेता केंद्रात हवा आहे.
अर्थातच भाजपला याची राजकीय कल्पना नाही असं नाही पण राणेंना मंत्री केलं तर मराठा समाज त्यातल्या त्यात युवा वर्ग भाजपच्या पाठिशी राहील असं गणित असू शकतं. विशेष म्हणजे राणेंच्या अध्यक्षतेखाली तयार झालेल्या समितीनं मराठा आरक्षणाची शिफारस केली होती ही राजकीय व सामाजिक नोंद विसरता येणार नाही.असा एक मास्टर प्लॅन भाजपा चा असू शकतो.
शिवसेनेचा कट्टर विरोध👉
राणे शिवसेनेचे नेते म्हणूनच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. शिवसेना प्रमुख बाळासाहेब असतानाच ते व राज ठाकरे सेनेतून बाहेर पडले. त्यांच्या बरोबर सात आमदार बाहेर पडले, उद्धव ठाकरेंशी त्यांचं जमलं नाही. राणे व ते आमदार थेट काँग्रेसमध्ये गेले. नंतर ते तिथूनही बाहेर पडले आणि स्वतः भाजपात गेले. भाजपानं त्यांना राज्यसभेवर खासदार केलं. दोन्ही मुलं राज्याच्या राजकारणात सक्रिय राहीले. या सगळ्या काळात नारायण राणेंच्या टार्गेटवर कोण राहिलं असेल तर ते उद्धव ठाकरे आणि शिवसेना. सध्या भाजपच्या टार्गेटवरही शिवसेना आणि तिचं नेतृत्व आहे. त्यामुळेच राणेंना बळ देऊन सेनेला आणखी नामोहरम करण्याचा” भाजपचा मास्टर प्लॅन” आहे,अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
मुबई साठी राणे “राजकीय मोहरा”👉
मुंबईची महानगरपालिका म्हणजे स्वतःचे राजकीय अस्तित्त्व आहे.मुबई मराठी माणसाच्या मदतीने ताब्यात घ्यायचा भारतीय जनता पक्षाचा राजकीय मास्टर प्लॅन तयार आहे,राणे , मुंबई,व कोकण असा मतदारांचा दुवा आहे.त्यामुळे राणे ना राजकीय ताकत देऊन हीलढाई भाजपसाठी काहीशी सोपी होऊ शकते
राणे चे राजकीय पुनर्वसन👉
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादी तून अनेक
मात्तब्बर राजकीय नेते भाजपा त आले.त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्याचा हेतू आहे,
राणे चर्चेतील नेता 👉
मोदींच्या मंत्री मंडळात चर्चेतील नेत्यांना संधी देण्याचा राजकीय मास्टर प्लॅन भाजपा चा आहे.महाराष्ट्रात सध्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,प्रकाश जावडेकर,पियूष गोयल हे चर्चेतील व अभ्यासू नेते आहेत.
त्याच्या जोडीला राणे सारखा आक्रमक नेता मंत्री मंडळात घेऊन राष्ट्रवादी व शिवसेना या सारख्या प्रादेशिक पक्षावर राजकीय हल्ला बोल करण्यास भाजपा चा मास्टर प्लॅन तयार आहे.
मोदी व शहा व फडणवीस काय भमिका घेतात याकडे राज्याचे संपूर्ण लक्ष लागून आहे.
