कृषीकन्यांनी सांगितले माती परीक्षणाचे महत्त्व

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )
खुंटे ( ता.फलटण ) गावामध्ये शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालय बारामतीच्या कृषीकन्यांनी माती परीक्षण काळाची गरज आहे हा विचार लक्षात घेवून माती परीक्षण प्रात्यक्षिकाचे आयोजित केले होते.
जमिनीचा खालावत चाललेला पोत, सेंद्रिय कर्बाचे कमी होत चाललेले प्रमाण आणि बेसुमार होत असलेला रासायनिक खतांचा वापर यामुळे जमिनीची सुपीकता कमी होत चालली आहे.पेरणीपूर्वी माती परीक्षण केल्यामुळे जमिनीत असलेले अन्नद्रव्यांचे प्रमाण तपासून खतांची मात्रा ठरवणे नेहमीच फायदेशीर ठरते.
माती परीक्षणासाठी प्रातिनिधिक नमुना घेण्याची पद्धत योग्य असणे गरजेचे आहे आणि म्हणूनच कृषीकन्यांनी खुंटे गावातील शेतकऱ्यांना माती परीक्षणासाठी नमुना घेण्याची पद्धत प्रात्यक्षिकाद्वारे सांगितली.या प्रात्यक्षिकाचे आयोजन कृषीकन्या साक्षी दळवे, सुस्मिता कारंडे, सायली काटे, प्रगती पाटील, वैष्णवी पाटील आणि पूजा फडतरे यांनी केले.या प्रात्यक्षिकाला खुंटे गावतील प्रगतशील शेतकरी तानाजी खलाटे, नारायण जगताप, शुभम जराड आणि इतर ग्रामस्थ उपस्थित होते. कृषीकन्यांना या प्रात्यक्षिकासाठी प्राध्यापक आर. गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले.
