इराणी शेतीचा दुष्काळग्रस्त भागांमध्ये वापर करून एकरी 80 टन उत्पन्न – शुभम विनोद पाटील
( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )
महाराष्ट्र शिर म्हणून ओळख असलेले सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील एक दुष्काळग्रस्त गाव म्हणजेच हनुमानवाडी ता. माळशिरस येथील एक प्रगतशील शेतकरी सतीश दत्त कुमार यादव हे एक सर्वसाधारण कुटुंबातील वाढलेले शेतकरी पहिल्यापासून शिक्षण कमी असल्यामुळे शेतीकडेच जास्त ओढ. दूध व्यवसाय बर्यापैकी चालत असल्यामुळे घरी जनावरे पाळण्याची जास्तीत ओढ होती. आपल्याकडे असलेले दीड एकर जमीन याचा कसा उपयोग करावा हा खूप मोठा प्रश्न होता. आणि माळशिरस तालुक्यातील सर्वात मोठा प्रश्न म्हणजे पाणी, बरोबर पावसाचा अंदाज नसल्यामुळे त्यांच्याकडे कोणते पीक घ्यायचं हा सर्वात मोठा प्रश्न होता. आणि त्या भागामध्ये ऊस पीक घेणं अशक्य होतं. अशा परिस्थितीत लॉन्च झालेली उसाची व्हरायटी 34 14 त्यांनी त्याचे दीड एकरामध्ये लागवड केली. ह्या उसाचे वैशिष्ट म्हणजे हाऊस बारा महिन्यांमध्ये bपरिपक्व होतो. आणि दुसरे वैशिष्ट्य म्हणजे या उसाला त्याच्या ठराविक वेळेवर पाणी भेटलेच पाहिजे. तर यांनीही दीड एकर लागवड पूर्ण सेंद्रिय खताच्या जोरावरती केली. एकही रासायनिक खताचा वापर न केल्यामुळे पंडा खूप कमी खर्च झाला व रोग व आळी यांचे सुद्धा प्रमाण कमी होते. तर हा असा आगळावेगळा प्रकल्प कृषिदूत शुभम विनोद पाटील यांनी आपल्यासमोर मांडला आहे. पुढे ते बोलत असताना म्हटले की, आपल्या भागातील शेतकरी हे खूप रासायनिक पद्धतीचा वापर करून आपल्या जमिनीची उगवणक्षमता याच्यावर परिणाम होतो तर येणाऱ्या काळामध्ये लोकांनी जास्त जास्त सेंद्रिय खताचा वापर करून आपले शेती प्रगतशील शेतीकडे वाटचाल करावी.
कृषिदूत शुभम विनोद पाटील
( शेती महाविद्यालय बारामती चतुर्थ वर्ष)
