Fri. Apr 24th, 2026

मौजे रेडा गावातील शेतकरी यांनी  येत्या पाच-चार दिवसात ” ई-पीक पहाणी  ” नोंद करा अंन्यथा शासनाच्या विविध योजना व अनुदानापासून वंचित रहाल – पोलीस पाटील ज्योती भोसले

Spread the love

मौजे रेडा गावातील शेतकरी यांनी  येत्या पाच-चार दिवसात ” ई-पीक पहाणी  ” नोंद करा अंन्यथा शासनाच्या विविध योजना व अनुदानापासून वंचित रहाल – पोलीस पाटील ज्योती भोसले

रेडा दि. ९ (शिव-कल्याण न्युज प्रतिनिधी)

मौजे रेडा गावातील शेतकरी यांनी  येत्या पाच-चार दिवसात ” ई-पीक पहाणी  ” नोंद करा अंन्यथा शासनाच्या विविध योजना व अनुदानापासून वंचित रहाल अशी माहिती रेडा गावच्या पोलीस पाटील ज्योती भोसले यांनी  दिली.

भोसले पाटील पुढे म्हणाल्या की, महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार १५ सप्टेंबर पर्यंत ई-पीक पहाणी ऑप डाऊनलोड करून रजिस्टर करावयाचे आहे  महसूल विभाग आणि कृषी विभागाच्यावतीनं ई-पीक पाहणी हा संयुक्त प्रकल्प राबवण्यात येत आहे. माझी शेती, माझा सातबारा, माझा पिकपेरा या घोषवाक्याचा आधारे शासनाने सुरू केलेल्या पीक पाहणी करण्याचा १५  ऑगस्टला श्री गणेश झाला आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पीक पाहणी अ‌ॅपला शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिलेला आहे. तर काही ठिकाणी महसूल प्रशासनाला पीक पाहणी ‌अ‌ॅपचा वापर करावा यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी लागत आहे. इंदापुर  तालुक्यात देखील तहशिलदार श्रीकांत पाटील  पीक पाहणी अ‌ॅपचा वापर करण्याचं आवाहन दररोज करत आहेत.

ई पीक पाहणी अ‌ॅपद्वारे नोंदवण्यास शेतकऱ्यांना एक महिन्याची मुदत देण्यात आली होती. पीक पाहणी अ‌ॅपमधून नोंदणीची मुदत १५ सप्टेंबरपर्यंत आहे. सातबारा उताऱ्यावर ऑनलाईन पद्धतीने खरीप हंगामातील पिकाच्या नोंदणीला अवघे पाच  दिवस शिल्लक राहिले आहेत. इंदापुर चे  तहसीलदार श्रीकांत पाटील  यांनी गावोगावीच्या  शेतकऱ्यांना या ॲपद्वारे पिक नोंदणी करण्याचे आवाहन करीत आहेत.

इंदापुर  तालुक्यातील महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी , पोलीस पाटील,  ग्रामसेवक रास्त भाव दुकानदार, कृषी सेविका, या थेट बांधावर जाऊन  शेतकऱ्यांचे प्रबोधन करत आहेत. तर, साखर कारखान्यातील शेतकी विभागातील कर्मचारी यांचीही मदत घेत आहेत  येत्या पाच दिवसाच्या आता या ॲपद्वारे नोंदी न झाल्यास शासनाकडून नैसर्गिक आपत्ती योजनेतून आर्थिक मदतीला मुकावे लागणारा आहे. असेही रेडा गावच्या पोलीस पाटील ज्योती भोसले यांनी सांगितले .

*शेतकऱ्यांचा थंड प्रतिसाद*

कृषीप्रधान तालुका म्हणून व डाळींब सोबत ऊस उत्पादनात  ओळख असलेल्या इंदापुर  तालुक्यात  २५ दिवस उलटले असल्यानंतरही शेतकऱ्यांकडून या ई-पिक पाहणी ॲपला पाहिजे तसा प्रतिसाद नसल्याचे चित्र दिसून आले आहे.  त्यामुळे आता स्वतः तहसीलदारश्रीकांत पाटील  गावोगावी महसूल व कृषी कर्मचारी सह पोलीस पाटील यांना  शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन या ई-पीक पाहणी ॲप ची माहिती देण्यासाठी सतत आढावा घेत आहेत व ई पिकाची  नोंदणी करण्याचे आवाहन करत आहेत.

*ई-पीक पाहणी शेतकरी यांना  मार्गदर्शक ठरेल*

आज दररोज हवामानात बदल होतो आहे. कधी अतिवृष्टीमुळे तर कधी पाऊस न पडल्याने पिकांचे नुकसान होते आहे. अशा काळात शासनाला शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई देताना अनेक अडचणी येतात कारण त्यावेळी पंचनामे करणे कठीण असते. पण या डिजिटल प्रणालीमुळे शेतकऱ्यांना अधिक मदत होणार आहे.

Related Post

error: Content is protected !!