दोन्ही निकाल माझ्या बाजूनेच, देश कायद्यानेच चालतो : नारायण राणे
( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )
भा.ज.पा.च्या जन आशीर्वाद यात्रेदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आक्षेपार्ह विधान केलं होतं.
त्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यानंतर २४ ऑगस्टला त्यांना अटक करण्यात आली होती.
२४ ऑगस्टला तारखेला उशिरा रात्री त्यांना जामीन मंजूर करण्यात आला.
त्यानंतर राज्याचं राजकारणात जोरदार पडसाद उमटू लागले आहेत.
शिवसेना भा.ज.पा.मध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत.
दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत उत्तरं दिली.
२७ ऑगस्टपासून जन आशीर्वाद यात्रेला पुन्हा सुरुवात होईल असं त्यांनी यावेळी सांगितलं.
नारायण राणे यांना १७ सप्टेंबरपर्यंत दिलासा मिळाला आहे.
पुढील सुनावणीपर्यंत कोणतीही कारवाई करणार नाही अशी ग्वाही सरकारने मे.मुंबई उच्च न्यायालयात दिली आहे.
“दोन्ही निकाल माझ्या बाजून लागले आहेत.
देशात अजूनही कायद्याचं राज्य आहे हे दिसून येतं.
काही जण माझ्या मैत्रीचा आणि चांगुलपणाचा फायदा उचलतात हेही माझ्या लक्षात आलं आहे.
जन आशीर्वाद यात्रा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली काम जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आहे.
गेल्या सात वर्षात त्यांनी केलेली काम तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम सुरु आहे.
दुसरं देशाच्या केंद्रीय मंत्रिमंडळात मला कॅबिनेट मंत्रिपद दिलं.
तेव्हा पंतप्रधान मोदी यांनी सर्व मंत्र्यांना सांगितलं की,
तुम्ही तुमच्या राज्यात जा आणि जनतेचा आशीर्वाद घ्या.
तुमच्या कामकाजाला सुरुवात करा.
१९ ऑगस्टपासून मी माझ्या जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली.
आता दोन दिवस विश्रांती घेत परवापासून सिंधुदुर्गातून यात्रेला सुरुवात होईल.
त्यामध्ये व्यत्यय पडणार नाही.”,
असं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सांगितलं.
