Fri. Apr 24th, 2026

कृषीदुताने सांगितले पोषक घटकाचे महत्व

Spread the love

कृषीदुताने सांगितले पोषक घटकाचे महत्व

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

कळंब (ता.इंदापूर )कृषी महाविद्यालय सोनई येथील कृषीदुत आशिष दत्तात्रय नलवडे याने पीक उत्पादनात सुक्ष्म पोषक घटकाचे कार्य आणि त्याचे महत्व याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत शेतकरी यांना विविध प्रात्यक्षिकाव्दारे मार्गदर्शन केले. दर्जेदार पीक उत्पादनासाठी सुक्ष्म पोषक घटक महत्वाचे असतात .पीकाच्या गरजेनुसार अन्न द्रव्याचा पुरवठा करणे गरजेचे असते असे आशिषने यावेळी उपस्थित शेतकरी यांना सांगितले.
यासाठी प्राचार्य डॉ.एच.जी.मोरे , प्रा.एस.एन.दरंदले आणि प्रा.कडू यांचे मार्गदर्शन लाभले.

Related Post

error: Content is protected !!