Sat. Jun 6th, 2026

बोराटवाडीमध्ये कृषीदूताने सांगितले शेतकऱ्यांना चारा प्रक्रियेचे महत्त्व 

Spread the love

बोराटवाडीमध्ये कृषीदूताने सांगितले शेतकऱ्यांना चारा प्रक्रियेचे महत्त्व

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

दि.२२ डिसेंबर : बोराटवाडी येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत डॉ. शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्य्रमाअंतर्गत बोराटवाडी (ता . इंदापूर ) येथील शेतकऱ्यांना चारा प्रक्रियेचे प्रत्याशिक करून दाखवले व त्याचे फायदे पटवून दिले.
जनावरांच्या रोजच्या चाऱ्या मध्ये प्रक्रिया केलेल्या चाऱ्याचे फायदे दिसून येत आहेत.

चारा प्रक्रियेमुळे चाऱ्याचा रुचकरपणा वाढतो. प्रत्येकी २०० ग्रॅम गूळ, मीठ, युरीयाचे मिश्रण प्रति १० किलो चारा प्रक्रियेसाठी शेतकरी वापरू शकतात. चारा प्रक्रियेमुळे चाऱ्याच्या पोषक घटकांमध्ये वाढ होते. परिणामी, जनावरांच्या दूध उत्पादनात देखील वाढ होते. जनावरांची शारीरिक वाढ, प्रजनन क्षमता ।। सुरळीत राखली जाते. अगदी कमी खर्चात आणि कम। वेळात जनावरांना पौष्टिक, सकस आहार उपलब्ध करून देता येतो.

अशा प्रकारची माहिती कृषिदूताने शेतकऱ्यांना दिली.
या उपक्रमाला शेतकऱ्यांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला .कृषीदुत झेंडे ओंकार, ननावरे प्रणित , कामथे मंगेश , लडकत मनोज, शेंडगे निर्भय , झेंडे संकेत ,शितोळे गिरीश , स्वामी शंकर यांनी शेतकऱ्यांना प्रात्याशिक करून दाखवले.या प्रात्याशिकासाठी प्राचार्य . एस. पी.गायकवाड सर , व्ही . एस. बुरुंगळे सर व ए. सी. शेंडे मॅडम यांचे मार्गर्शन लाभले .

Related Post

error: Content is protected !!